kolhapur accident news

kolhapur accident news :  कोल्हापूर येथे भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अपघाताची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. कारण हा अपघात पाहिला तर एकही माणूस जीवंत राहणार नाही असे प्रथम दर्शनी पाहिल्यानंतर वाटते. सुदैवाने या अपघातमध्ये जीवित हानी झाली नाही. 

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अजब दुर्घटना

कोल्हापूरमधील विशाळगडावर जाणार्‍या रस्‍त्‍यावर गजापूर बौद्धवाडीमध्ये एक अजब दुर्घटना घडली आहे. विशाळगडावर फिरण्यासाठी आलेले हातकणंगले येथील पाच जण आपल्या कारसह एका खोलाच्या कासारी नदीत पडले. या दुर्घटनेत कारचा चुराडा झाला. वेळ आली होती, परंतु काळ नव्हता. नशिबाने कारमधील पाच जणही बचावले आहेत. यामुळे बघणार्‍याना प्रत्यक्षदर्शींनी आश्‍चर्य वाटत आहे. या दुर्घटनेची नोंद शाहुवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

दुर्घटनेत कारचा चेंदा मेंदा झाला

दुर्घटनेत कारचा चेंदा मेंदा झाला आहे. कारचे चालक शुभम कोळी आणि यश हाप्पे ही दोघे जखमी झाले आहेत. तर इतर तिंघांना किरकोळ जघम झाली आहे. सर्वांची खात्री केली आणि त्यांच्या उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. पैकी दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून उर्वरित तिघेही हातकणंगलेमध्ये आपापल्या घरी पोहोचले आहेत. कार भरधाव वेगाने आली आणि वीस फुटावरून खाली कोसळली. सुदैवाने असा घटना घडला आणि कोणताही मानवी जीव गमावला नाही. या घटनेनंतर सर्वांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.
सध्या उन्हाळा असल्याने कासारीच्या धरणात पाणी आता कमी आहे. ज्या ठिकाणी कार पडली त्या कारच्या ठिकाणी पाणी नव्हते. जेव्हा अपघाताबद्दल माहिती मिळाली तेव्हा परिसरातील लोक घटनास्थळीवर धावून बचाव कार्यक्रम सुरू केला. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने कोल्हापूर येथे खासगी दवाखान्यात दाखल झाले आहे आणि त्यांचावर सध्या उपचार सुरू आहेत.

असेच ताज्या अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉइन व्हा!

हे पण वाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
चेहऱ्यावर दिसणाऱ्या या ६ लक्षणांवरून ओळखा लिव्हर खराब झालंय